
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:चला जाणूया नदीला अभियान नदीसाक्षरतेच्या दृष्टिकोणातून अत्यंत महत्वाचे आहे. नदीची मालकी ही प्रत्येकाची असून जिल्ह्यातील मांजरा, लेंडी, मन्याड, आसना, पैनगंगा, सिता, कयाधू या नदीवर पूर्वीपासून अनेक अनुभवी संस्था काम करत आहेत. या संस्थासमवेत कृषि, सिंचन, मृदसंधारण, सामाजिक वनिकरण, तहसिल, पंचायत समिती आदी तालुका पातळीवरील कार्यालय प्रमुखांनी मिशनमोडवर यात आपला सहभाग दिला पाहिजे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीचला जाणुया नदीला अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपवनसंरक्षक अधिकारी केशव वाबळे, सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख, जयाजी पाईकराव, बालासाहेब शेंबोलीकर, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) चे कार्यकारी अभियंता अशिष चौगले, लेंडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता वि. पा. तिडके, कार्यकारी अभियंता अभय जगताप, भूजल संरक्षण विकास यंत्रणाचे शिवकिरण धाडे, सहयोगी प्राध्यापक डॉ. एन. एच. कुलकर्णी, मांजरा नदी समन्वयक दिपक मोरताळे, कयाधूनदीचे समन्वयक दयानंद कदम, यादव बोरगावकर, कैलास येसगे, वसंत रावणगावकर, शिवाजी देशपांडे, आसन नदी समन्वयक प्रा. डॉ. लॉर्ड पॉल आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकांच्या मनात आपल्या गाव कुसातून वाहणाऱ्या नदीप्रती नेमक्या कोणत्या भावना आहेत हे या अभियानाच्या निमित्ताने जाणून घेतले पाहिजे. याचबरोबर नदीच्या स्वास्थाबाबत व पर्यावरण संतुलनाबाबत ते कोणत्या पद्धतीने आवडीनुसार मदत करण्यास तत्पर आहेत हेही जाणुन घेणे महत्वाचे आहे..
मदत करण्यास तत्पर आहेत हेही जाणुन घेणे महत्वाचे आहे. प्रत्येक नागरिकांच्या मनात आपल्या गावशिवारात असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्ती विषयी जो पर्यंत आस्था निर्माण होणार नाही तो पर्यंत त्यांचा कृतीशील सहभाग यात घेता येणार नाही, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले.
चला जाणुया नदीला या अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीच्या मदतीला व कार्याला सहकार्य व्हावे या उद्देशाने
त्या-त्या नदी गटाप्रमाणे तालुकास्तरीय वेगळी
नेमून त्यात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसह शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सहभागी करून घेतले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. हे अभियान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शालेय पातळीवर निबंध स्पर्धा, एनएसएस, एनसीसी, स्काउट आदी विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले जाईल. विद्यार्थ्यांच्या मनातही नदीचे नेमके आरोग्य कसे आहे याची उकल व्हावी व शालेय शिक्षणापासूनच नदीप्रती आस्था निर्माण व्हावी यादृष्टिने नदी सहलींचे आयोजन करण्याबाबत संबंधित शैक्षणिक संस्थांना निर्देश दिले जातील, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.