
दैनिक चालू वार्ता संभाजीनगर प्रतिनिधी-शितल रमेश पंडोरे
————————————————–
संभाजीनगर:- औरंगाबाद-जळगांव टी पॉईंट ते अजिंठा लेणी पर्यंत च्या रस्त्याची कामे जानेवारी अखेर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडयेय यांनी राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले .
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार आणि पोलीस अधिकारी मनीष कालवनिय यांनी हर्सूल ते अजिंठा रस्त्याची संयुक्त पाहणी केली .
तहलसीदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांत समन्वय ठेऊन रस्त्याचे काम पुर्ण करावे.
या कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांनवर कारवाई करण्याची येणार असल्याचे ही श्री पांडेय यांनी सांगितले.
यावेळी पोलीस अधीक्षक मनीष कलवाणीया ,उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे ,तहसीलदार ज्योती पवार, फुलंब्री तहसीलदार शितल राजपूत ,सिल्लोड तहसीलदार ,विक्रम राजपूत ,सोयगाव तहसीलदार श्री जसवंत पल्लवी सोनवणे ,कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्गा औरंगाबाद, तहसीलदार ,विकास महाले ,कार्यकारी अभियंत राष्ट्रीय महामार्ग धुळे ,शाखा अभियंता सागर कळव ,गजानन कमेकर तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी रस्ते पाहणी दरम्यान उपस्थित होते. पर्यटकांची संख्या पाहत अजिंठा लेणी परिसरात रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची नेमणूक करावी. एक खिडकी तिकीटाची निर्मिती तसेच वीजपुरवठा खंडित होऊ नये. म्हणून महावितरण आणि वन विभागाने याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. लेणी परिसरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ भारतीय पुरातत्व विभाग यांनी पर्यटकांसाठी आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्याचे देखील जिल्हाधिकाऱ्या ची दिले.