
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी -श्री, रमेश राठोड
:::;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;+-;+-;;;;;;;;
आर्णी तालुक्यातील गौण खनिजाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावळी सदोबा परिसरातील चिमटा,दातोडी,खड्का, रत्नापूर सह बहुत अंश प्रसिद्ध रेती घाट असुन,सध्या जिल्ह्यात कोणत्याच रेती घाटाचा लिलाव झालेला नसून,चिमटा या रेतीघाट सध्या रेती तस्करासाठी खुले झाले की काय अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे,दररोज संध्याकाळपासून रात्रीपर्यंत व पहाटेला शेकडो ट्रॅक्टर द्वारे नदीपात्रातून अवैध रेती काढून काठावर शेकडो ब्रास रेतीचा साठा करून ठेवली जात आहे, ही साठवणूक केलेली रेती रात्रीला 15ते 16 टिप्परद्वारे यवतमाळ,वाशिम,मंगरुळपिर,वर्धा पांढरकवडा,तेलंगणाकडे पाठविले जात आहे,याकडे मात्र महसूल विभाग व पोलीस प्रशासन हेतू पुरस्कार दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र या दुर्गम परिसरामध्ये पाहायला मिळत आहे,चिमटा रेती घाटावरून दररोज दहा ते पंधरा टिप्पर अवैध रेती भरून जात आहे अर्थात 90 ते 100 ब्रास रेती दररोज चोरी जात आहे, सावळी सदोबा परिसरामध्ये हा प्रकार मागील अनेक दिवसापासून अविरत सुरू असल्याने,आतापर्यंत हजारो ब्रास रेतीची चोरी झाली असल्याने शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा महसूल पाण्यात बुडाला आहे, सुप्रसिद्ध चिमटा रेती घाटावर पैनगंगा व आडाण या दोन्हीही नदीचा संगम असल्याने,या रेती घाटात मोठ्या प्रमाणात रेती साचल्या जाते, या साचलेल्या रेतीची महसूल विभागाच्या नाकावर टिचून रेती तस्कराकडून मोठ्या प्रमाणात तस्करी केल्या जात आहे, झटपट पैसे कमावण्याच्या रेती तस्करी या व्यवसायामध्ये अनेक राजकीय पांढरपेशी नेत्यांचा वास्तव असल्याने,रेती तस्करींचा हा व्यवसाय निरंतर सुरू राहावा यासाठी या परिसरातील रेती तस्करांची जबरदस्त फील्डिंग लावलेली आहेत,अवैध रेती तस्करांच्या आर्थिक हितसंबंधातून आर्णी महसूल विभाग व पारवा पोलीस विभागाचे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगणमताने अवैध रेती तस्करींचा गोरख धंदा परिसरामध्ये राजरोसपणे चालतोय,अशी खंत परीसरातील काही शुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे,आर्णी महसूल विभाग व पारवा पोलीस प्रशासन जणू रेती तस्करांच्या दावणीलाच बांधलेली असल्याचे चित्र सध्या या परिसरात पाहायला मिळते,महसूल विभागाकडून रेती तस्करी करणाऱ्या तस्कराकडून पठाणी वसुलीसाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहेत अशी चर्चा सुद्धा परिसरातील नागरिकाकडून ऐकायला मिळत आहेत,महसूल विभागाचा अधिकारी कोणत्या मार्गाने रेती घाटाकडे येत आहे याची सखोल माहिती रेती तस्कराकडे असते, त्यामुळेच बिनधास्तपणे अवैद्य रेती तस्करी करणाऱ्यांचा मार्ग मोकळा होतो.