
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
देगलूर: शहर परिसरातून सर्वच महामार्ग रस्त्यांवर क्षमतपेक्षा अधिक वजन वाहतूक करण्याची स्पर्धाच लागली आहे. ओव्हरलोड वाळू वाहतूक करून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडविला जात आहे. आरटीओंच्या पथकालाही हुलकावणी देत ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांची दहशत वाढली असल्याचे चित्र सर्रास दिसत आहे. अनेक वाहनांची वजन वाहून नेण्याची क्षमता नसतानाही क्षमतेपेक्षा दोन ते तीन पट वाळू वाहून नेण्याची स्पर्धाच सुरू आहे. यात प्रामुख्याने वाळू तसेच अन्य साहित्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे प्रत्येक ट्रक ताडपत्रीने बांधलेला असल्यामुळे वजन करण्याचे कष्ट आरटीओ अथवा पोलीस टाळतात. याचा
फायदा टिप्पर हायवा चालक घेत आहेत. वाळू वाहतुकीतून सर्वात जास्त वजनांचे नियम मोडीत काढले जात आहेत. टिप्पर अथवा ट्रॅक्टरमधून वाळू वाहतुकीने सर्वांनाच जेरीस आणले आहे. वाळू वाहतूकदार क्रमांक न लिहिताच अथवा तो पुसत करून वाहतूक करीत आहेत. यामुळे तहसील अथवा पोलिसांना कारवाई करताना अडचण येत आहे. अतिक्ति भार आणि भरधावामुळे वाळू टिप्परमधून अपघातांची संख्या गत काही महिन्यांत वाढल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले वळण रस्त्यांवर पोलीस नेमणूक केले असले तरी त्यांचे काम क्रमांक नसणे, कागदपत्र तपासणे कामे येतात. ओव्हरलोड तपासण्याचा अधिकार त्यांना नसल्याचे आरटीओंनी सांगितले.दरम्यान या देगलूर बिदर मार्गावरील ओव्हरलोड वाहनाचे काही आरटीओ अधिकाऱ्याना हप्ते असल्याची चर्चा असून नेमणूक केलेले अधिकाऱ्यांना आर्थिक लाभ असणारी वाहने सोडून दिली जात असल्याचे बोलले जात आहे. परिणामी गेल्या सहा महिन्यात ओव्हरलोड वाहनावर कारवाई झाल्याचे ऐकवत नाही. त्यामुळे ओव्हरलोड वाहतूक सुसाट आहे. अशा या ओव्हरलोड वाहतुकीवर प्रशासन लवकरात लवकर कारवाई करावी अशी देगलूर परिसरातील जनतेकडून बोलले जाते.