
महाराष्ट्रात कोणकोणाचा पद्म पुरस्काराने सन्मान?
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. यंदाही प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भारतरत्न पुरस्कारानंतर पद्म पुरस्कार हा प्रतिष्ठेचा मानला जातो.
देशाच्या सर्वोच्च नागरिक सन्मानांपैकी एक असलेला पद्म पुरस्कार हा तीन श्रेणींमध्ये दिला जातो. पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात येणाऱ्या मान्यवरांच्या नावांची केंद्र सरकारच्या वतीनं घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये राजकारण, कला, क्रीडा, सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्या देशातील एकूण 139 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या पद्म पुरस्कारांमध्ये 7 मान्यवरांचा पद्म विभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तर माजी मुख्यमंत्री मनोज जोशी, पंकज उदास, सुशील मोदी यांसह 19 जणांना पद्मभूषण प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ, अच्युत पालव, अश्विनी भिडे-देशपांडे यांसह तब्बल 113 जणांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
पद्मभूषण पुरस्काराने ‘या’ व्यक्तींचा सन्मान
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच भारतातील उत्कृष्ट गझल गायक पंकज उदास यांनाही मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच बॉलिवूडचे अतिशय प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक शेखर कपूर यांना त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीसाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.