
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-संपूर्ण अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिमदृष्टीने अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या अचलपूर शहरात जवळपास दोन हजार लोकांच्या सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुकीतून मुस्लिम अंतयात्रेला रस्ता देण्यात आला.तसेच अंत्ययात्रेदरम्यान मिरवणुकीतील सर्व वाद्ययंत्रे,लेझीम बंद करून रस्त्याच्या दुतारफा उभे राहून हिंदू-मुस्लिम एकतेचे उदाहरण दिले.हिंदू-मुस्लिम एकतेचे उदाहरण प्रस्तुत करणाऱ्या अचलपुरातील झेंडा चौक येथील सार्वजनिक गणेश मंडळाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.यामध्ये समन्वयक घडविणाऱ्या अचलपूर पोलिसांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.
शुक्रवारी दिनांक ९ सप्टेंबर रोजी बिलानपुरा अचलपूर येथील एका प्रतिष्ठित मुस्लिम पुरुषाचा मृत्यू झाला.त्याचदिवशी हिंदूंचा गणपती सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीचा दिवस आपण अंत्ययात्रा कशी काढावी हा मोठा प्रश्न मुस्लिम मयत घरातील नागरिकांना पडला.घरच्या नागरिकांनी याबाबत अचलपूर पोलीसांची संपर्क केला.पोलीसांनी तात्काळ मयत झालेल्या नागरिकांचे घर गाठून नातेवाईक यांच्याशी याबाबत चर्चा केली तसेच अंतयात्रेला पूर्ण संरक्षण देण्याची हमी दिली.
याबाबत पोलीसांनी झेंडा चौक येथील गणपती मंडळाची सुद्धा संपर्क करून समन्वयक घालण्याचा प्रयत्न केला.अचलपुरातील झेंडा चौक हे अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो.याचभागातून सार्वजनिक गणपती मंडळाची मिरवणुकीची वेळ आणि हाच अंतयात्रा रस्ता मुस्लिम बांधवांना पोलीसांनी विश्वासात घेऊन पूर्ण अंत्ययात्रेला पोलीस बंदोबस्त देण्याचा सांगितले.त्यानुसार अंतयात्रा बिलालपुरा येथे संध्याकाळी आली व तेथेच जनाजे नमाज पडुन मुस्लिम कब्रस्तान कडे निघाले.अंतयात्रेच्या वेळेस झेंडा चौक येथील हनुमान व्यायाम मंडळ व नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक भर रंगात होती मिरवणुकीमध्ये पारंपारिक वाद्य यंत्रे ढोल ताशे लेझीम होते मुस्लिम अंतयात्रा सहभागी ४०० ते ५०० नागरिक झेंडा चौक वर येतात गणपती मंडळांनी आपले सर्व वाद्ययंत्रे व लेझीम बंद करून सर्व नागरिक रस्त्याच्या दोन्ही बाजूने मन उभे राहून मुस्लिम यात्रेला रस्ता करून दिला मुस्लिम अंतयात्रा पोलीसांनी खिडकीगेट पर्यंत सोडून दिली.या घटनेनंतर मुस्लिम अमन ग्रुपच्या वतीने गणपती मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.मुस्लिम हिंदू समाजाचे समन्वयक साधण्याकरता अचलपूरचे ठाणेदार माधवराव गरुड डी.बी.स्कॉडचे पुरुषोत्तम बावनेर तसेच एलसीबी चे अधिकारी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.गणपती मंडळांनी केलेल्या या कार्याचे सर्व समाजात कौतुक होत आहे.मुस्लिम अंत्ययात्रेला हिंदू गणपती सार्वजनिक मंडळांनी आपली वाद्य यंत्रे बंद करून काैमी एकतेचा सुरेख संदेश दिला हिंदू व मुस्लिम दोन्ही समाजाला एकत्र आणण्याकरता अचलपूर पोलीसांनी समन्वय घडून आणला.